जलप्रदूषण

जलप्रदूषण

Jump to navigationJump to search

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे. हवा - पाणी -अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या द्रुष्टीने खुपच महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.


ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.

जल प्रदूषणाची निरिक्षण

  • औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.
  • नदीत कपडे/गुरे धुणे,अंघोळ करणे, भांडी घासणे यामुळे जलप्रदूषण होते.
  • रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते.

जल प्रदूषणाला शहरीकरण, आणि शहरातील अपुरे सांडपाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचे कारण आहे. तसेच रोजच्या वापरातील शरीर स्वच्छता आणि घराची स्वच्छता यासाठी वापरण्यात येणारी विविध रसायने यांचा महत्त्वाचा भाग आहे.

No comments:

Post a Comment